बार्शी – श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संचलित लोकसेवा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आगळगाव येथे आनंददायी शनिवार- व्यक्तिमत्त्व विकास उपक्रमांतर्गत रोटरी क्लब ऑफ बार्शी यांच्या सहकार्याने विविध मार्गदर्शनपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी ८ ते ११ या वेळेत झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ बार्शीचे अध्यक्ष नवनाथ गुल्हाणे हे होते. यावेळी सचिन नलावडे, डॉ. संजय हिंगमिरे, विशाल कोकाटे, मधुकर डोईफोडे, गोविंद बाफना, आनंद बेदमुथा, संदीप सोनवणे, संतोष जोशी (रोटरी क्लब सदस्य) तसेच भारत विकास परिषदेचे अध्यक्ष राहुल पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक सचिन उकिरडे यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी नवनाथ गुल्हाणे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्त्व विकास, यशस्वी जीवनासाठी आवश्यक गुण, तसेच आई-वडील व शिक्षकांप्रती कृतज्ञतेची भावना जोपासण्याचे महत्त्व पटवून दिले.
सचिन नलावडे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा दैनंदिन जीवनात व शिक्षणात प्रभावी वापर, त्याचे फायदे व संभाव्य तोटे याविषयी इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
डॉ. संजय हिंगमिरे यांनी कर्करोगासारख्या गंभीर आजारांबाबत जनजागृती करत त्याची कारणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. विशाल कोकाटे यांनी आर्थिक शिस्त, बचत आणि योग्य आर्थिक नियोजनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना उदाहरणांसह स्पष्ट केले. मधुकर डोईफोडे यांनी शाळेच्या परिसराची पाहणी करुन जलतारा स्पॉट निश्चित करण्याबाबत मार्गदर्शन केले आणि त्याचे पर्यावरणीय फायदे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश मिरगणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अजय टोपे यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील बचुटे,
कोळेकर, कापसे, श्रीमती मोरे, श्रीमती जाधवर, श्रीमती अवतार, श्रीमती लोखंडे, श्रीमती निकम तसेच शिक्षकेतर कर्मचारी चंद्रकांत दोडमनी यांनी मोलाचे सहकार्य केले.
विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध विषयांवरील माहितीचा लाभ घेतला. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्त्व विकास, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर, आरोग्य, आर्थिक शिस्त आणि पर्यावरण संवर्धनाबाबत सकारात्मक जागरुकता निर्माण झाली.
Post Views: 11